गाण्याचे कडवे
एका लहान मुलीच्या जीवनातील तीन वर्षांची ही कहाणी.हे तिचे उमलण्याचे दिवस. ह्याच दिवसांत तिची भेट ऊन-पावसाशी होते, चंद्र सूर्यांशी होते, फुलांशी होते, रंगांशी होते. नवी नाती जुळत जातात. मनाचे आकाश फैलावत जाते. प्रत्येक दिवशी एक नवा तारा या आकाशात उगवतो. नवे रस्ते भेटतात. नवी माणसे भेतातात. वाहता वाहता विस्तारत जाणाऱ्या नदीच्या पात्रासारखे तिचे आयुष्य पुढे सरकत जाते.
तिच्या मनावर पडलेल्या जगाच्या प्रतिबिंबांची ही कहाणी. तिच्याच शब्दांत. जीवनातील सौंदर्य व अर्थ शोधीत तिला अजून पुढे जायचे आहे. .... महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९९७-९८
|