अर्पणपत्रिका : सुहास शुभदा सुधीर आणि वर्षा यांच्या आठवणीस
परतून कुणूही घराकडे जाऊ शकत नाही हे आधुनिक साहित्यातील एक महत्त्वाचे आशयसूत्र आहे. तरीही माणसे आपल्या भूतकाळाकडे जाऊ पाहतात. काय हवे असते त्यांना? त्यांना जे मिळते ते खरेच मौल्यवान असते का? माणसे जे प्रश्न घेऊन मागे जातात त्यांची उत्तरे त्यांना मिळतात का? असे प्रश्न घेऊन आपल्या भूतकाळाकडे वळलेल्या आणि हा प्रवास शब्दबद्ध करू पाहणार्या एका लेखकाला अचानक एक आकृतीबंध सापडतो. कलाकृतीचा आणि जीवनाचाही. त्याला जाणवत जाते, आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत असा अट्टहास नकोच बाळगायला. कारण या प्रवासात एक वेगळा आनंद आहे आणि तसाच तो या प्रवासाची गोष्ट सांगण्यातही आहे…
ही एक ‘वास्तव-काल्पनिका’ आहे की ‘कल्पित सत्यकथा’ याचा निर्णय लेखकाने वाचकांवर सोपविला आहे.
ही एक ‘वास्तव-काल्पनिका’ आहे की ‘कल्पित सत्यकथा’ याचा निर्णय लेखकाने वाचकांवर सोपविला आहे.
लेखकाच्या काही नोंदी:
1} Flaubert ने लिहिले आहे, ‘One is not at all free to write this or that. One does not choose one’s subject. या कादंबरीचा ‘विषय’ खरोखरीच मी निवडला नाही. एका कल्पनेने माझा ताबा घेतला आणि मला लिहिणे भागच पडले. आपण आणि भूतकाळ यांच्यामध्ये एक विस्मरणाची टेकडी उभी असते. आपण शोधतो तो गाव त्या टेकडीमागे असतो. ती टेकडी धुक्याने वेढलेली असते. आपण जितके जवळ जाऊ तितके ते धुके दाट होत जाते. कालांतराने आपण गावात पोहचलो आहो की नाही हेच आपल्याला समजत नाही. मग जी अस्पष्ट दृश्ये आपल्याला दिसतात तेच गाव आहे अशी समजूत आपण करून घेतो.
पण फारकाळ आपण स्मरण-विश्वात राहू शकत नाही. आपल्याला वर्तमान-विश्वात यावेच लागते. पण आपला ‘अनुभव’ कुणाला तरी सांगावा वाटतो. तो शब्दातून मांडताना आपल्याला जाणवते की पुन्हा आपला प्रवास त्या टेकडीच्या दिशेनेच होतो आहे. पुन्हा आपल्याला धुक्याने वेढलेली दृश्ये दिसतात. पण यावेळी त्यांच्यात काही सूक्ष्म फरक झालेला देखील जाणवतो.
काय खरे होते? आठवताना आठवलेले की शब्दातून मांडताना प्रकटत असलेले?
हळूहळू आपण हा विचार करणे थांबवतो. खरे खोटे यातला भेद आता गौण वाटू लागतो. हळू हळू शब्दातून मांडण्याच्या या खेळात आपल्याला आनंद वाटू लागतो. आणि आपण लिहू लागतो. कादंबरीला विषय असेलच तर तो हा आहे.
2] अनेक जणांनी मला विचारले की हे नाव का दिले/ कसे सुचले वगैरे. ही कादंबरी मी सुमारे चार वर्षे लिहीत होतो. ती लिहीत असताना तिच्या रचनेत देखील अनेक बदल होत गेले. नाव ठरविले नव्हतेच. कादंबरीला असलेली सुमारे साठ वर्षांपूर्वीच्या कंधार या गावाची पार्श्वभूमी ध्यानात घेऊन फक्त एक, निर्माणाधीन सिनेमाला असते तसे, working title ठरविले होते-'टेकडीमागचे गाव.'
एकदा जी.एंच्या संदर्भात एक लेख लिहीत असताना त्यांची मला आलेली पत्रे चाळत होतो. माझे पहिले पुस्तक 'देखीला अक्षरांचा मेळावा' हे मी त्यांना भेट पाठविले होते. तेव्हा त्यांनी लिहिले होते, 'वाचलेल्या पुस्तकांचा आनंद त्यांतील ऊब तशीच ठेऊन नोंदणे हे फार कठीण काम आहे. पण तुम्ही आपली आनंद हुरहूर आत्मियतेने मांडली आहे.'
हे वाचताना मला श्री. श्री. पु. भागवतांची आठवण झाली. त्यांनीही मला लिहीलेल्या एका पत्रात जवळजवळ हेच विचार व्यक्त केले होते. 'कोणत्याही ग्रंथाच्या वाचनाने तुम्हाला झालेला आनंद वाचकाला देण्याची शक्ती तुमच्या लेखनात आहे.'
ही दोन्ही पत्रे आठवली आणि प्रथम मनात विचार आला, पुस्तकांच्या वाचनाने झालेला आनंद आपण वाचकांपर्यंत पोहोचवू शकतो तर जीवनाचे पुस्तक वाचल्यामुळे झालेला आनंद का नाही पोहोचवू शकणार?
आणि माझ्या कादंबरीचे नाव मला दिसले. [कारण माझ्या कादंबरीतील मुख्य पात्र आनंद पोहचविण्याचा प्रयत्न करणार्या एका लेखकाचेच आहे]
3] आनंद हे माणसाच्या आत्म्याचे मुख्य लक्षण आहे. त्याची अभिव्यक्ती म्हणजे कला. माणसाला त्याच्या आत दडलेल्या आनंदाच्या विश्वात पुन्हा घेऊन जाणे हे कलेचे महत्त्वाचे कार्य आहे. कला ज्याप्रमाणे हा आनंद आस्वादकाला देते त्याप्रमाणेच कलेची निर्मिती करणार्या कलावंतालाही तो देते. या पातळीवर एकाला झालेला आनंद हा इतरांच्या मनातील आनंदाचे उगमस्थान बनू शकतो. जे आपण अनुभवतो आणि ज्या पद्धतीने ते अनुभवतो तो अनुभव इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न म्हणजे कला. लेखकाच्या संदर्भात सांगायचे झाले तर जो content लेखक त्याच्या या माध्यमाद्वारे इतरांपर्यंत पोचवू पाहतो तो content म्हणजे कला नव्हे. कला ही कलावंत आपले माध्यम कसे उपयोगात आणतो यावर अवलंबून असते आणि त्यातून प्रकट होते.
म्हणूनच कादंबरीत काय सांगितलेले आहे हेच फक्त महत्त्वाचे नसते तर ते कसे सांगितलेले आहे हे देखील महत्त्वाचे आहे.या दोन्ही वाटा जेव्हा एकमेकात मिसळून जातात तेव्हा आनंदाची निर्मिती होते.
गोष्ट सांगण्याचा मला झालेला आनंद जर गोष्ट वाचणार्याला झाला तर ते या कादंबरीचे यश. अन्यथा ती अयशस्वी आहे.
अर्थात लेखक या यशापयशाकडे तटस्थपणे पाहतो आहे कारण
एक: वाचलेल्या कलाकृतीचे मूल्यमापन करणे हा वाचकाचा हक्क आहे हे मान्य. पण इतरांनी केलेले मूल्यमापन मान्य करणे हे आपले कर्तव्य आहे असे लेखक मानत नाही.
दोन: कादंबरीत असलेल्या, पूर्वी न दिसलेल्या काही उणिवा त्याला कुणी दाखविल्या आणि त्याला पटल्या तरी तिच्यात आता बदल करता येत नाही. म्हणून तिचे मूळ गुण-अवगुण जे आहेत ते तसेच राहणार.
तीन: सर्वात महत्त्वाचे म्हणजे लिहीत असताना त्याला जो आनंद मिळाला तो अगोदर मिळालेलाच आहे.
चार: अर्थात लेखक काही स्थितप्रज्ञ बनलेला नाही. एखाद्या वाचकाला कादंबरी वाचून आनंद मिळावा एवढी ‘ख्वाहिष’ त्याच्या मनात कायम असणारच. आणि जर तो मिळाला तर तो लेखकासाठी ‘बोनस’ असेलच.
1} Flaubert ने लिहिले आहे, ‘One is not at all free to write this or that. One does not choose one’s subject. या कादंबरीचा ‘विषय’ खरोखरीच मी निवडला नाही. एका कल्पनेने माझा ताबा घेतला आणि मला लिहिणे भागच पडले. आपण आणि भूतकाळ यांच्यामध्ये एक विस्मरणाची टेकडी उभी असते. आपण शोधतो तो गाव त्या टेकडीमागे असतो. ती टेकडी धुक्याने वेढलेली असते. आपण जितके जवळ जाऊ तितके ते धुके दाट होत जाते. कालांतराने आपण गावात पोहचलो आहो की नाही हेच आपल्याला समजत नाही. मग जी अस्पष्ट दृश्ये आपल्याला दिसतात तेच गाव आहे अशी समजूत आपण करून घेतो.
पण फारकाळ आपण स्मरण-विश्वात राहू शकत नाही. आपल्याला वर्तमान-विश्वात यावेच लागते. पण आपला ‘अनुभव’ कुणाला तरी सांगावा वाटतो. तो शब्दातून मांडताना आपल्याला जाणवते की पुन्हा आपला प्रवास त्या टेकडीच्या दिशेनेच होतो आहे. पुन्हा आपल्याला धुक्याने वेढलेली दृश्ये दिसतात. पण यावेळी त्यांच्यात काही सूक्ष्म फरक झालेला देखील जाणवतो.
काय खरे होते? आठवताना आठवलेले की शब्दातून मांडताना प्रकटत असलेले?
हळूहळू आपण हा विचार करणे थांबवतो. खरे खोटे यातला भेद आता गौण वाटू लागतो. हळू हळू शब्दातून मांडण्याच्या या खेळात आपल्याला आनंद वाटू लागतो. आणि आपण लिहू लागतो. कादंबरीला विषय असेलच तर तो हा आहे.
2] अनेक जणांनी मला विचारले की हे नाव का दिले/ कसे सुचले वगैरे. ही कादंबरी मी सुमारे चार वर्षे लिहीत होतो. ती लिहीत असताना तिच्या रचनेत देखील अनेक बदल होत गेले. नाव ठरविले नव्हतेच. कादंबरीला असलेली सुमारे साठ वर्षांपूर्वीच्या कंधार या गावाची पार्श्वभूमी ध्यानात घेऊन फक्त एक, निर्माणाधीन सिनेमाला असते तसे, working title ठरविले होते-'टेकडीमागचे गाव.'
एकदा जी.एंच्या संदर्भात एक लेख लिहीत असताना त्यांची मला आलेली पत्रे चाळत होतो. माझे पहिले पुस्तक 'देखीला अक्षरांचा मेळावा' हे मी त्यांना भेट पाठविले होते. तेव्हा त्यांनी लिहिले होते, 'वाचलेल्या पुस्तकांचा आनंद त्यांतील ऊब तशीच ठेऊन नोंदणे हे फार कठीण काम आहे. पण तुम्ही आपली आनंद हुरहूर आत्मियतेने मांडली आहे.'
हे वाचताना मला श्री. श्री. पु. भागवतांची आठवण झाली. त्यांनीही मला लिहीलेल्या एका पत्रात जवळजवळ हेच विचार व्यक्त केले होते. 'कोणत्याही ग्रंथाच्या वाचनाने तुम्हाला झालेला आनंद वाचकाला देण्याची शक्ती तुमच्या लेखनात आहे.'
ही दोन्ही पत्रे आठवली आणि प्रथम मनात विचार आला, पुस्तकांच्या वाचनाने झालेला आनंद आपण वाचकांपर्यंत पोहोचवू शकतो तर जीवनाचे पुस्तक वाचल्यामुळे झालेला आनंद का नाही पोहोचवू शकणार?
आणि माझ्या कादंबरीचे नाव मला दिसले. [कारण माझ्या कादंबरीतील मुख्य पात्र आनंद पोहचविण्याचा प्रयत्न करणार्या एका लेखकाचेच आहे]
3] आनंद हे माणसाच्या आत्म्याचे मुख्य लक्षण आहे. त्याची अभिव्यक्ती म्हणजे कला. माणसाला त्याच्या आत दडलेल्या आनंदाच्या विश्वात पुन्हा घेऊन जाणे हे कलेचे महत्त्वाचे कार्य आहे. कला ज्याप्रमाणे हा आनंद आस्वादकाला देते त्याप्रमाणेच कलेची निर्मिती करणार्या कलावंतालाही तो देते. या पातळीवर एकाला झालेला आनंद हा इतरांच्या मनातील आनंदाचे उगमस्थान बनू शकतो. जे आपण अनुभवतो आणि ज्या पद्धतीने ते अनुभवतो तो अनुभव इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न म्हणजे कला. लेखकाच्या संदर्भात सांगायचे झाले तर जो content लेखक त्याच्या या माध्यमाद्वारे इतरांपर्यंत पोचवू पाहतो तो content म्हणजे कला नव्हे. कला ही कलावंत आपले माध्यम कसे उपयोगात आणतो यावर अवलंबून असते आणि त्यातून प्रकट होते.
म्हणूनच कादंबरीत काय सांगितलेले आहे हेच फक्त महत्त्वाचे नसते तर ते कसे सांगितलेले आहे हे देखील महत्त्वाचे आहे.या दोन्ही वाटा जेव्हा एकमेकात मिसळून जातात तेव्हा आनंदाची निर्मिती होते.
गोष्ट सांगण्याचा मला झालेला आनंद जर गोष्ट वाचणार्याला झाला तर ते या कादंबरीचे यश. अन्यथा ती अयशस्वी आहे.
अर्थात लेखक या यशापयशाकडे तटस्थपणे पाहतो आहे कारण
एक: वाचलेल्या कलाकृतीचे मूल्यमापन करणे हा वाचकाचा हक्क आहे हे मान्य. पण इतरांनी केलेले मूल्यमापन मान्य करणे हे आपले कर्तव्य आहे असे लेखक मानत नाही.
दोन: कादंबरीत असलेल्या, पूर्वी न दिसलेल्या काही उणिवा त्याला कुणी दाखविल्या आणि त्याला पटल्या तरी तिच्यात आता बदल करता येत नाही. म्हणून तिचे मूळ गुण-अवगुण जे आहेत ते तसेच राहणार.
तीन: सर्वात महत्त्वाचे म्हणजे लिहीत असताना त्याला जो आनंद मिळाला तो अगोदर मिळालेलाच आहे.
चार: अर्थात लेखक काही स्थितप्रज्ञ बनलेला नाही. एखाद्या वाचकाला कादंबरी वाचून आनंद मिळावा एवढी ‘ख्वाहिष’ त्याच्या मनात कायम असणारच. आणि जर तो मिळाला तर तो लेखकासाठी ‘बोनस’ असेलच.