प्रकाशक: राजहंस प्रकाशन, मुंबई
प्रथमावृत्ती: २०१६
|
किंमत: २६०/-
पृष्ठे: २२४
|
अर्पणपत्रिका : सौ. पुष्पास,
ही नाव चालली आहे ती तुझ्यामुळेच....
ही नाव चालली आहे ती तुझ्यामुळेच....
विभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या ‘पथेर पांचाली’ व ‘अपराजितो’ या कादंबऱ्यावर आधारित ‘पथेर पांचाली’, ‘अपराजितो’ आणि ‘अपूर संसार’ असे तीन अप्रतीम चित्रपट सत्यजित राय यांनी निर्माण केले. ही त्यांची सुप्रसिद्ध ‘अप्पू त्रिवेणी’. मूळ कादंबऱ्या व चित्रपट यांचा तुलनात्मक अभ्यास करणारे ‘नाव आहे चाललेली’ हे पाडळकरांचे अभ्यासपूर्ण पुस्तक ‘राजहंस प्रकाशन’ पुणे यांनी २००४ साली प्रकाशित झाले व साहित्य आणि सिनेमा यांच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ या पुस्तकाने रोवली. पुढे पाडळकरांचा माध्यमान्तराचा हा अभ्यास चालूच राहिला. त्यांनी मूळ साहित्यकृती व तिच्यावर आधारित चित्रपट या विषयाच्या अनुषंगाने सत्यजित राय यांच्या ‘चारुलता’, ‘तीन कन्या’, ‘शतरंज के खिलाडी’ आणि ‘गणशत्रू’ या चित्रपटांवर दीर्घ लेखन केले. मूळ पुस्तकांत या नव्या लेखांची भर घालून ‘गगन समुद्री बिंबले’ हा ग्रंथ ‘राजहंस’ तर्फेच प्रकाशित करण्यांत आला आहे.
'गगन समुद्री बिंबले' हे पुस्तक म्हणजे एक भन्नाट अनुभव आहे. दोन वेगवेगळ्या अभिजात कलाकृतींचे एकत्रित रसपान केल्याचा भन्नाट अनुभव. चार महान साहित्यकारांच्या तितक्याच महान साहित्य कृतींवर आधारित सत्यजित राय यांच्या अ रसास्वाद हा खरे तर या पुस्तकाचा विषय. पण हा रसास्वाद घेतांना वाचक नकळत अभिजात साहित्याची सफर करून येतो. पाडळकर यांनी अनेक ठिकाणी मूळ साहित्य कृती व चित्रपट यांची तुलना केली आहे, पण कुणाचीही न घेता. हे पुस्तक वाचताना आपल्यालाही कुणाची बाजू घ्यावी वाटत नाही ही पाडळकरांच्या मांडणीची जमेची बाजू आहे. ..चित्रपट अभ्यासकांबरोबर सर्वसामान्यासाठीही हा एक संग्राह्य दस्तऐवज ठरतो. नव्या वाचत्या पिढीला रवींद्रनाथ ,प्रेमचंद विभूतिभूषण यांच्या साहित्याकडे खेचून नेण्याची क्षमता या पुस्तकांत आहे. महाराष्ट्र टाईम्स . ९ एप्रिल २०१७
'गगन समुद्री बिंबले' हे पुस्तक म्हणजे एक भन्नाट अनुभव आहे. दोन वेगवेगळ्या अभिजात कलाकृतींचे एकत्रित रसपान केल्याचा भन्नाट अनुभव. चार महान साहित्यकारांच्या तितक्याच महान साहित्य कृतींवर आधारित सत्यजित राय यांच्या अ रसास्वाद हा खरे तर या पुस्तकाचा विषय. पण हा रसास्वाद घेतांना वाचक नकळत अभिजात साहित्याची सफर करून येतो. पाडळकर यांनी अनेक ठिकाणी मूळ साहित्य कृती व चित्रपट यांची तुलना केली आहे, पण कुणाचीही न घेता. हे पुस्तक वाचताना आपल्यालाही कुणाची बाजू घ्यावी वाटत नाही ही पाडळकरांच्या मांडणीची जमेची बाजू आहे. ..चित्रपट अभ्यासकांबरोबर सर्वसामान्यासाठीही हा एक संग्राह्य दस्तऐवज ठरतो. नव्या वाचत्या पिढीला रवींद्रनाथ ,प्रेमचंद विभूतिभूषण यांच्या साहित्याकडे खेचून नेण्याची क्षमता या पुस्तकांत आहे. महाराष्ट्र टाईम्स . ९ एप्रिल २०१७
या पुस्तकासंदर्भात त्यांच्याशी शुभांगी बागडे यांनी केलेली ही चर्चा-
आपण कथा, कादंबरी, ललित लेखन असे विविध प्रकारचे साहित्यप्रकार यशस्वीपणे हाताळले आहेत. आपले नवे ‘गगन समुद्री बिंबले’ हे पुस्तक यापैकी कोणत्या गटात मोडते?
या पुस्तकाला सर्वसाधारणपणे कला-आस्वादपर, समीक्षा लेखन असे म्हणता येईल. चित्रपट ही आजच्या युगाची अत्यंत महत्त्वाची कला आहे. या कलेचा अभ्यास विविध पद्धतीने केला जाऊ शकतो. अनेक चित्रपट हे गाजलेल्या साहित्यकृतींवरून तयार केले जातात. त्या मूळ कृती आणि त्यांच्यावर आधारित चित्रपट यांच्यातील साम्य-विरोधांची चर्चा करणे, मूळ कलाकृतीत झालेल्या बदलांची चिकित्सा करणे आणि दोन्ही कलाकृतींचा आस्वादकाच्या मनावर होणारा परिणाम शब्दबद्ध करणे हे माझ्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. ‘चंद्रावेगळं चांदणं’ या १९९६ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाद्वारे मराठीत मी सर्वप्रथम या दिशेने चित्रपट अभ्यासाची सुरुवात केली आहे. ‘गगन समुद्री बिंबले’ हे नवे पुस्तक हा माझ्या याच ‘माध्यमांतर’-अभ्यासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
या पुस्तकासंबंधी थोडे तपशीलवार सांगा.
सत्यजित राय हे जगातील सर्वश्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक. या महान कलावंताच्या चित्रपटांचा अभ्यास करतांना मला जाणवले की त्यांचे बहुसंख्य चित्रपट हे कुठल्या न कुठल्या गाजलेल्या साहित्य कृतीवर आधारित आहेत. एखादा मनस्वी कलावंत कलेच्या आपल्या क्षेत्रातील पुनर्निर्मितीसाठी जेव्हा दुसऱ्या एखाद्या क्षेत्रातील कलावंताचा आधार घेतो तेव्हा त्यामागे काय कारणे असतात, त्याच्यासमोर काय आव्हाने असतात व तो त्यांना कसा सामोरा जात आपले एक स्वतंत्र विश्व कसे निर्माण करतो हे सत्यजित राय यांच्या चित्रपटांतून अतिशय ठळकपणे जाणवणारे अंतप्रवाह. यांचा शोध घेण्याचा प्रयत्न मी ‘नाव आहे चाललेली’ या पुस्तकातून प्रथम केला. त्या पुस्तकांत राय यांची गाजलेली ‘अपू त्रिवेणी’ आणि विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या मूळ दोन कादंबऱ्या यांचा तौलनिक अभ्यास सादर केला होता. नंतर माझ्या ध्यानात आले की सत्यजित राय हे एका पुस्तकात मावणारे कलावंत नाहीत. त्यांच्या चित्रपटांचा अभ्यास हा आयुष्यभर पुरणारा विषय आहे. त्यानंतरच्या काळात मी राय यांचे ‘तीन कन्या’, ‘चारुलता’, [हे दोन्ही चित्रपट रवींद्रनाथ टागोरांच्या कथांवर आधारित], ‘शतरंज के खिलाडी’ [प्रेमचंदांच्या कथेवर] आणि ‘गणशत्रू’ [इब्सेनच्या ‘Enemy of the people’ या नाटकावर] या चित्रपटांचाही या दृष्टीने अभ्यास केला. प्रस्तुत पुस्तकांत ‘अपू त्रिवेणी’सह या नव्या चित्रपटांवरील लेखांचाही अंतर्भाव करण्यांत आला आहे.
या अभ्यासातून तुम्ही कोणते निष्कर्ष काढले आहेत?
‘गगन समुद्री बिंबले’ या पुस्तकाला मी ‘माध्यमांतर’ या विषयावर एक सविस्तर प्रस्तावना जोडली आहे. तिच्यात आणि पुस्तकातील अन्य लेखांत हे निष्कर्ष मी तपशीलवार मांडले आहेत. एखादा चित्रपट जेव्हा गाजलेल्या साहित्य कृतीवर आधारित असतो तेव्हा तो पाहतांना रसिकाला प्रथम दिग्दर्शकाने मूळ पुस्तकांत केलेले बदल ठळकपणे जाणवतात. तसे ते अभ्यासकालाही जाणवतात. पण कुठलेही पुस्तक जसेच्या तसे चित्रपटांत रूपांतरित करता येत नाही ही गोष्ट सर्वप्रथम ध्यानात घेतली पाहिजे, कारण शब्दमाध्यम आणि दृश्यमाध्यम यांचे स्वरूपच अत्यंत वेगळे आहे. तेव्हा बदल हे होणारच, त्यांच्याबद्दल तक्रार करण्यात अर्थ नाही. मात्र मतभेद निर्माण होतात ते या बदलांचे प्रमाण किती असावे याबद्दल. शिवाय अनेक बदल हे केवळ माध्यमाची गरज म्हणून केले जात नाहीत. त्या बदलांमागे व्यवसायाशी तडजोड हेही एक महत्त्वाचे कलाबाह्य कारण असते. बऱ्याच वेळा मूळ कलाकृतीची निर्माता-दिग्दर्शक यांच्या लहरीप्रमाणे हवीतशी मोडतोड केली जाते. माध्यमान्तराचा अभ्यास करतांना कोणते बदल अटळ होते यांचा विचार केला पाहिजे तसेच उरलेले बदल का केले याचाही अभ्यास केला पाहिजे. शिवाय या बदलांमुळे मूळ कलाकृतीचे सौंदर्य वाढले की कमी झाले याचीही चिकित्सा केली पाहिजे.
या प्रकारच्या अभ्यासाविषयी मराठी चित्रपट समीक्षकांत काही गैरसमज आहेत. एखाद्या चित्रपटापेक्षा मूळ साहित्यकृती श्रेष्ठ होती असे प्रतिपादन केले की त्यांना तो चित्रपटकलेचा अपमान वाटतो. वास्तविक असे नसते. या अभ्यासाचा हेतूच मुळी एखादी कला श्रेष्ठ व दुसरी कनिष्ठ असे दाखविणे हा नसतो. हा तौलनिक अभ्यास आहे. कधीकधी चित्रपट हा मूळ साहित्य कृतीपेक्षा अतिशय सरस असतो. अनेकदा नेमके उलटही घडते. माध्यमांतर अभ्यासतांना दोन्ही माध्यमांची बलस्थाने व मर्यादा लक्षात घ्याव्या लागतात.
माझे लेखन वाचून काही चित्रपटप्रेमी अभ्यासकांनी चित्रपट व साहित्य या दोन वेगवेगळ्या कला आहेत व म्हणून माध्यमान्तराचा अभ्यास करण्याचीच गरज नाही अशी भूमिका घेतली. चित्रपटात काय दाखविले आहे व ते ‘कसे’ दाखविले आहे याचाच-चित्रपटीय अभिव्यक्तीचाच- विचार करावा, मूळ साहित्याकडे वळण्याचे कारण नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. दुसरीकडे साहित्याच्या अभ्यासकांनी, चित्रपटविषयक लेखन हे करमणूकप्रधान व बिनमहत्त्वाचे असते असा गैसमज मनात असल्यामुळे, त्याची दखल घेण्याचे टाळले. या दोन्ही भूमिका टोकाच्या असून त्या अभ्यास आणि विश्लेषण नाकारणाऱ्या आहेत असे माझे मत आहे. चित्रपट समीक्षा ही साहित्यिक समीक्षेचा एक भाग मानली पाहिजे कारण तिच्यातून कला विषयक वेगळा विचार मांडला जाऊ शकतो. इंग्रजीत या विषयावर हजारो ग्रंथ आहेत, अमेरिकेत व युरोपात अनेक युनिवर्सिटीमधून हा विषय शिकविला जातो, आणि तो चित्रपटअभ्यासाचे महत्त्वाचे अंग आहे हे मान्य झालेले आहे. इंग्रजीच्या प्राध्यापकाने शेक्सपिअरच्या नाटकावर तयार केलेले चित्रपट अवश्य पाहावेत कारण त्यामुळे शेक्सपिअर समजण्यास अधिक मदत होईल असे मत एका तज्ज्ञाने मांडले आहे. आमचे किती प्राध्यापक जाणकारीने सिनेमा पाहतात?
अशा प्रकारचा अभ्यास चित्रपटकलेविषयीची जनसामान्यांची जाण वाढवणारा ठरू शकतो. चित्रपट ही केवळ करमणूक नव्हे, ती अनेक अंगांनी तपासता येईल अशी कला आहे हे जागरूक वाचकाला या पुस्तकाच्या वाचनातून कळेल. शिवाय या अभ्यासाला एक मानसशास्त्रीय बैठक देखील आहे. सत्यजित राय जेव्हा मूळ कलाकृतीत काही बदल करतात तेव्हा ते तसे का करतात याचा अभ्यास त्या थोर दिग्दर्शकाची मानसिकता व जडण घडण यांच्यावर प्रकाश टाकू शकतो. नवीन पटकथाकारांच्या दृष्टीनेही असा अभ्यास महत्त्वाचा आहे कारण कथेवरून पटकथा तयार करतांना कोणती पथ्ये पाळावी लागतात हे या अभ्यासाने समजू शकते. शिवाय Intertextual study व Narratology अशा नवीन ज्ञानशाखांतही या अभ्यासाचा उपयोग होऊ शकतो.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा अभ्यास जेव्हा केला जातो तेव्हा ‘चित्रपट कला श्रेष्ठ की साहित्य’ असा विचार त्यामागे नसतोच. येथे तुलना असते ती एकाच बीजांतून निर्माण होणाऱ्या दोन वृक्षांची. उदाहरणार्थ ‘शतरंज के खिलाडी’ हा प्रेमचंदांच्या कथेवरील चित्रपट फसला आहे असे म्हटले की तो सत्यजित राय यांचा अपमान आहे असे समजणे चुकीचे आहे. एकाच लेखकाच्या साऱ्या कथा जशा श्रेष्ठ नसतात त्याप्रमाणे एका दिग्दर्शकाचे सारे चित्रपटही श्रेष्ठ नसतात. हे कटू वाटले तरी सत्य आहे.
सत्यजित राय यांच्या चित्रपटांनी मला जो आनंद दिला आहे तो इतरांना वाटणे आणि त्या चित्रपटांनी मला व्यक्ती म्हणून कसे श्रीमंत केले आहे ह्याचा शोध घेणे हे या लेखनाचे प्रधान हेतू आहेत. एका प्रतिभावंताच्या कृतीमधून दुसऱ्या प्रतिभावंताने निर्मिलेले प्रभावी विश्व म्हणजे जणू आकाशाने समुद्रात उतरणे होय. हे आकाशाचे समुद्रातील रूप न्याहाळतांना वाचकालाही तो आनंद मिळावा ही अपेक्षा.
या पुढील आपला नवा प्रकल्प कोणता आहे?
सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा अभ्यास अजून पूर्ण झाला नाही. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी २९ चित्रपट निर्माण केले शिवाय काही डॉक्युमेंटरी व लघुपटही काढले. या चित्रपटांच्या अभ्यासासाठी मूळ साहित्यकृती वाचण्यास मिळणे आवश्यक आहे. दुर्दैवाने त्यांनी निर्मिलेले काही चित्रपट असे आहेत की ज्यांच्या मूळ साहित्यकृती [इंग्रजी अनुवादात] उपलब्ध नाहीत. ज्या उपलब्ध झाल्या आहेत त्यांच्यावरील कामाला सुरुवात केली आहे. सत्यजित हा विषय कायमचा साथ देणारा आहे व तो तसा राहावा हीच इच्छा.
आपण कथा, कादंबरी, ललित लेखन असे विविध प्रकारचे साहित्यप्रकार यशस्वीपणे हाताळले आहेत. आपले नवे ‘गगन समुद्री बिंबले’ हे पुस्तक यापैकी कोणत्या गटात मोडते?
या पुस्तकाला सर्वसाधारणपणे कला-आस्वादपर, समीक्षा लेखन असे म्हणता येईल. चित्रपट ही आजच्या युगाची अत्यंत महत्त्वाची कला आहे. या कलेचा अभ्यास विविध पद्धतीने केला जाऊ शकतो. अनेक चित्रपट हे गाजलेल्या साहित्यकृतींवरून तयार केले जातात. त्या मूळ कृती आणि त्यांच्यावर आधारित चित्रपट यांच्यातील साम्य-विरोधांची चर्चा करणे, मूळ कलाकृतीत झालेल्या बदलांची चिकित्सा करणे आणि दोन्ही कलाकृतींचा आस्वादकाच्या मनावर होणारा परिणाम शब्दबद्ध करणे हे माझ्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. ‘चंद्रावेगळं चांदणं’ या १९९६ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाद्वारे मराठीत मी सर्वप्रथम या दिशेने चित्रपट अभ्यासाची सुरुवात केली आहे. ‘गगन समुद्री बिंबले’ हे नवे पुस्तक हा माझ्या याच ‘माध्यमांतर’-अभ्यासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
या पुस्तकासंबंधी थोडे तपशीलवार सांगा.
सत्यजित राय हे जगातील सर्वश्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक. या महान कलावंताच्या चित्रपटांचा अभ्यास करतांना मला जाणवले की त्यांचे बहुसंख्य चित्रपट हे कुठल्या न कुठल्या गाजलेल्या साहित्य कृतीवर आधारित आहेत. एखादा मनस्वी कलावंत कलेच्या आपल्या क्षेत्रातील पुनर्निर्मितीसाठी जेव्हा दुसऱ्या एखाद्या क्षेत्रातील कलावंताचा आधार घेतो तेव्हा त्यामागे काय कारणे असतात, त्याच्यासमोर काय आव्हाने असतात व तो त्यांना कसा सामोरा जात आपले एक स्वतंत्र विश्व कसे निर्माण करतो हे सत्यजित राय यांच्या चित्रपटांतून अतिशय ठळकपणे जाणवणारे अंतप्रवाह. यांचा शोध घेण्याचा प्रयत्न मी ‘नाव आहे चाललेली’ या पुस्तकातून प्रथम केला. त्या पुस्तकांत राय यांची गाजलेली ‘अपू त्रिवेणी’ आणि विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या मूळ दोन कादंबऱ्या यांचा तौलनिक अभ्यास सादर केला होता. नंतर माझ्या ध्यानात आले की सत्यजित राय हे एका पुस्तकात मावणारे कलावंत नाहीत. त्यांच्या चित्रपटांचा अभ्यास हा आयुष्यभर पुरणारा विषय आहे. त्यानंतरच्या काळात मी राय यांचे ‘तीन कन्या’, ‘चारुलता’, [हे दोन्ही चित्रपट रवींद्रनाथ टागोरांच्या कथांवर आधारित], ‘शतरंज के खिलाडी’ [प्रेमचंदांच्या कथेवर] आणि ‘गणशत्रू’ [इब्सेनच्या ‘Enemy of the people’ या नाटकावर] या चित्रपटांचाही या दृष्टीने अभ्यास केला. प्रस्तुत पुस्तकांत ‘अपू त्रिवेणी’सह या नव्या चित्रपटांवरील लेखांचाही अंतर्भाव करण्यांत आला आहे.
या अभ्यासातून तुम्ही कोणते निष्कर्ष काढले आहेत?
‘गगन समुद्री बिंबले’ या पुस्तकाला मी ‘माध्यमांतर’ या विषयावर एक सविस्तर प्रस्तावना जोडली आहे. तिच्यात आणि पुस्तकातील अन्य लेखांत हे निष्कर्ष मी तपशीलवार मांडले आहेत. एखादा चित्रपट जेव्हा गाजलेल्या साहित्य कृतीवर आधारित असतो तेव्हा तो पाहतांना रसिकाला प्रथम दिग्दर्शकाने मूळ पुस्तकांत केलेले बदल ठळकपणे जाणवतात. तसे ते अभ्यासकालाही जाणवतात. पण कुठलेही पुस्तक जसेच्या तसे चित्रपटांत रूपांतरित करता येत नाही ही गोष्ट सर्वप्रथम ध्यानात घेतली पाहिजे, कारण शब्दमाध्यम आणि दृश्यमाध्यम यांचे स्वरूपच अत्यंत वेगळे आहे. तेव्हा बदल हे होणारच, त्यांच्याबद्दल तक्रार करण्यात अर्थ नाही. मात्र मतभेद निर्माण होतात ते या बदलांचे प्रमाण किती असावे याबद्दल. शिवाय अनेक बदल हे केवळ माध्यमाची गरज म्हणून केले जात नाहीत. त्या बदलांमागे व्यवसायाशी तडजोड हेही एक महत्त्वाचे कलाबाह्य कारण असते. बऱ्याच वेळा मूळ कलाकृतीची निर्माता-दिग्दर्शक यांच्या लहरीप्रमाणे हवीतशी मोडतोड केली जाते. माध्यमान्तराचा अभ्यास करतांना कोणते बदल अटळ होते यांचा विचार केला पाहिजे तसेच उरलेले बदल का केले याचाही अभ्यास केला पाहिजे. शिवाय या बदलांमुळे मूळ कलाकृतीचे सौंदर्य वाढले की कमी झाले याचीही चिकित्सा केली पाहिजे.
या प्रकारच्या अभ्यासाविषयी मराठी चित्रपट समीक्षकांत काही गैरसमज आहेत. एखाद्या चित्रपटापेक्षा मूळ साहित्यकृती श्रेष्ठ होती असे प्रतिपादन केले की त्यांना तो चित्रपटकलेचा अपमान वाटतो. वास्तविक असे नसते. या अभ्यासाचा हेतूच मुळी एखादी कला श्रेष्ठ व दुसरी कनिष्ठ असे दाखविणे हा नसतो. हा तौलनिक अभ्यास आहे. कधीकधी चित्रपट हा मूळ साहित्य कृतीपेक्षा अतिशय सरस असतो. अनेकदा नेमके उलटही घडते. माध्यमांतर अभ्यासतांना दोन्ही माध्यमांची बलस्थाने व मर्यादा लक्षात घ्याव्या लागतात.
माझे लेखन वाचून काही चित्रपटप्रेमी अभ्यासकांनी चित्रपट व साहित्य या दोन वेगवेगळ्या कला आहेत व म्हणून माध्यमान्तराचा अभ्यास करण्याचीच गरज नाही अशी भूमिका घेतली. चित्रपटात काय दाखविले आहे व ते ‘कसे’ दाखविले आहे याचाच-चित्रपटीय अभिव्यक्तीचाच- विचार करावा, मूळ साहित्याकडे वळण्याचे कारण नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. दुसरीकडे साहित्याच्या अभ्यासकांनी, चित्रपटविषयक लेखन हे करमणूकप्रधान व बिनमहत्त्वाचे असते असा गैसमज मनात असल्यामुळे, त्याची दखल घेण्याचे टाळले. या दोन्ही भूमिका टोकाच्या असून त्या अभ्यास आणि विश्लेषण नाकारणाऱ्या आहेत असे माझे मत आहे. चित्रपट समीक्षा ही साहित्यिक समीक्षेचा एक भाग मानली पाहिजे कारण तिच्यातून कला विषयक वेगळा विचार मांडला जाऊ शकतो. इंग्रजीत या विषयावर हजारो ग्रंथ आहेत, अमेरिकेत व युरोपात अनेक युनिवर्सिटीमधून हा विषय शिकविला जातो, आणि तो चित्रपटअभ्यासाचे महत्त्वाचे अंग आहे हे मान्य झालेले आहे. इंग्रजीच्या प्राध्यापकाने शेक्सपिअरच्या नाटकावर तयार केलेले चित्रपट अवश्य पाहावेत कारण त्यामुळे शेक्सपिअर समजण्यास अधिक मदत होईल असे मत एका तज्ज्ञाने मांडले आहे. आमचे किती प्राध्यापक जाणकारीने सिनेमा पाहतात?
अशा प्रकारचा अभ्यास चित्रपटकलेविषयीची जनसामान्यांची जाण वाढवणारा ठरू शकतो. चित्रपट ही केवळ करमणूक नव्हे, ती अनेक अंगांनी तपासता येईल अशी कला आहे हे जागरूक वाचकाला या पुस्तकाच्या वाचनातून कळेल. शिवाय या अभ्यासाला एक मानसशास्त्रीय बैठक देखील आहे. सत्यजित राय जेव्हा मूळ कलाकृतीत काही बदल करतात तेव्हा ते तसे का करतात याचा अभ्यास त्या थोर दिग्दर्शकाची मानसिकता व जडण घडण यांच्यावर प्रकाश टाकू शकतो. नवीन पटकथाकारांच्या दृष्टीनेही असा अभ्यास महत्त्वाचा आहे कारण कथेवरून पटकथा तयार करतांना कोणती पथ्ये पाळावी लागतात हे या अभ्यासाने समजू शकते. शिवाय Intertextual study व Narratology अशा नवीन ज्ञानशाखांतही या अभ्यासाचा उपयोग होऊ शकतो.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा अभ्यास जेव्हा केला जातो तेव्हा ‘चित्रपट कला श्रेष्ठ की साहित्य’ असा विचार त्यामागे नसतोच. येथे तुलना असते ती एकाच बीजांतून निर्माण होणाऱ्या दोन वृक्षांची. उदाहरणार्थ ‘शतरंज के खिलाडी’ हा प्रेमचंदांच्या कथेवरील चित्रपट फसला आहे असे म्हटले की तो सत्यजित राय यांचा अपमान आहे असे समजणे चुकीचे आहे. एकाच लेखकाच्या साऱ्या कथा जशा श्रेष्ठ नसतात त्याप्रमाणे एका दिग्दर्शकाचे सारे चित्रपटही श्रेष्ठ नसतात. हे कटू वाटले तरी सत्य आहे.
सत्यजित राय यांच्या चित्रपटांनी मला जो आनंद दिला आहे तो इतरांना वाटणे आणि त्या चित्रपटांनी मला व्यक्ती म्हणून कसे श्रीमंत केले आहे ह्याचा शोध घेणे हे या लेखनाचे प्रधान हेतू आहेत. एका प्रतिभावंताच्या कृतीमधून दुसऱ्या प्रतिभावंताने निर्मिलेले प्रभावी विश्व म्हणजे जणू आकाशाने समुद्रात उतरणे होय. हे आकाशाचे समुद्रातील रूप न्याहाळतांना वाचकालाही तो आनंद मिळावा ही अपेक्षा.
या पुढील आपला नवा प्रकल्प कोणता आहे?
सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा अभ्यास अजून पूर्ण झाला नाही. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी २९ चित्रपट निर्माण केले शिवाय काही डॉक्युमेंटरी व लघुपटही काढले. या चित्रपटांच्या अभ्यासासाठी मूळ साहित्यकृती वाचण्यास मिळणे आवश्यक आहे. दुर्दैवाने त्यांनी निर्मिलेले काही चित्रपट असे आहेत की ज्यांच्या मूळ साहित्यकृती [इंग्रजी अनुवादात] उपलब्ध नाहीत. ज्या उपलब्ध झाल्या आहेत त्यांच्यावरील कामाला सुरुवात केली आहे. सत्यजित हा विषय कायमचा साथ देणारा आहे व तो तसा राहावा हीच इच्छा.